kenjalgad fort – वाईचा केंजळगड, छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे नामकरण केले होते

रांगड्या सातारा जिल्ह्यातील रांगडा गड म्हणजे Kenjalgad Fort होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यांमध्ये असणार्‍या डोंगरात अगदी थाटात उभा आहे. गडाची सध्या दुरावस्था झाली असली तरीही गडाचं ऐतिहासिक महत्त्व लख्ख सोन्यासारखं आज, उद्या आणि भविष्यातही चकाकत राहणार आहे. पुणे आणि वाई या दोन जिल्ह्यांच्या दरम्यान … Read more

Rajgad Fort – राजांचा राजगड, स्वराज्याची पहिली राजधानी; एकदा पहाच

राजियांचा राजगड हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आणि शिवकाळातील सर्वात महत्त्वाचा डोंगरी किल्ला म्हणजे Rajgad Fort होय. स्वराज्यावर चौफेर नजर ठेवण्यासाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने राजगड हा योग्य गड होता. तोरणा गडाच्या तुलनेत राजगड हा दुर्गम असून त्याचा बोलकिल्ला तोरणा गडापेक्षा मोठा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गडावर येण्यासाठी गणिमाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागणार होता. याच … Read more

Panhala fort – जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज वेढ्यातून मुक्त झाले, वाचा संपूर्ण इतिहास…

पन्हाळगडाचा इतिहास (Panhala Fort Information in Marathi)  पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात निसर्गाची मुक्त उधळणं झालेली पहायला मिळते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासात महत्वाचे स्थान आहे. याच कोल्हापूर जिल्ह्यात निसर्गसौंदर्याने नटलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे Panhala Fort. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेवेळी संरक्षणाच्या दृष्टीने डोंगरी किल्ल्यांना अधिक … Read more

Pratapgad fort; अफझल्याचा माज छत्रपती शिवरायांनी उतरवला, आदिलशाहीला घडली मराठ्यांच्या मर्दुमकीची धसकी

शुरवीरांचा जिल्हा म्हणून सातारा प्रचलित आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावातील एक व्यक्ती Indian Army मध्ये देशाची सेवा करत आहे किंवा देशाची सेवा करुन निवृत्त झाला आहे. परंतु सातारा जिल्ह्याची ‘शुरवीरांचा जिल्हा’ ही ओळख फक्त या एकाच कारणामुळे पडलेली नाही. सातारा म्हणजे शिवशंभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली मऱ्हाट भूमी. जिल्ह्यातील अनेक मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली, … Read more

Chandan Vandan Fort; साताऱ्याची जुळी भावंडे

शिलाहार वंशातील दुसरा भोज हा शेवटचा व श्रेष्ठ राजा होय. त्याने सातारा जिल्ह्यात 10-12 किल्ले बांधल्याची इतिहासात नोंद आहे. त्यांपैकी सप्तर्षी (सातारा किंवा अजिंक्यतारा), वैराटगड, पांडवगड, केंजळगड आणि चंदन-वंदन (Chandan Vandan Fort) हे काही प्रसिद्ध किल्ले आहेत. सन 1701 च्या आसपास फतेउल्लाखानाने वर्धनगड, नांदगिरी, चंदन, वंदन हे किल्ले जिंकून घेण्यासाठी हल्ले चढवले. मुघलांनी 6 जून … Read more

Pandavgad Fort; विराटनगरी वाईचा पहारेकरी

इतिहासाच्या पानांवर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याचं नावं सुवर्ण अक्षरांनी लिहीण्यात आले आहे. आजही इतिहासाच्या पाऊलखुणा वाईमध्ये आढळून येतात. वाईला प्रामुख्याने मंदिरे, गडकिल्ले, कृष्णा नदी आणि सह्याद्रीची विस्तीर्ण रांगेने वेढलेले आहे. वाई व खंडाळा तालुक्यांदरम्यान शंभु महादेव डोंगर रांगांमध्ये येरूळी, वेरूळी, मांढरदेव, बालेघर, धामणा आणि हरळी या प्रमुख डोंगरांचा समावेश आहे. याच शंभु महादेवाच्या डोंगर रांगेमध्ये … Read more

Vairatgad Fort; वाईचा पाठीराखा, सतीशिळा असणारा गड

सातारा जिल्ह्यातील सर्वच जिल्ह्यांना ऐतिहासिक महत्व लाभलं आहे. परंतु या सर्व जिल्ह्यांमध्ये वाईच नाव प्रथम क्रमांकावर घ्यावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. ढोल्या गणपतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वाईमद्ये मराठी विश्वकोश कार्यालय आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण वाईतील मेणवलीच्या घाटावर आणि ढोल्या गणपतीच्या परिसरात होत असतं. ऐतिहासीक महत्व लाभलेल्या या वाई शहराचा पाठीराखा … Read more

Irshalgad Fort; भूस्खलनामुळे प्रकाशझोतात आलेला गड, दुर्घटनेची वर्षपूर्ती

मागच्या वर्षी जुलै महिन्यात (2023) दु:खद घटना घडली आणि पाहता पाहता इर्शाळगडावर (Irshalgad Fort) असणारी इर्शाळवाडी दरड कोसळल्याने नेस्तनाबूत झाली. 70 हून अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला, तर असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली. जुलै महिन्यात या भयंकर दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होतील. त्यामुळे सर्वप्रथन या दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. रायगड जिल्ह्यात माथेरानच्या डोंगररागांमध्ये आणि खालापूर तालुक्यामध्ये … Read more

Sondai Fort; मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या आसपास आणि माथेरानच्या डोंगररांगांमध्ये असंख्य गडकिल्ले थाटात वसले आहेत. या सर्व गडांचे आपापले वैशिष्ट्य आहे. काही गडांची नावे ही गडावरील देवीच्या नावाने पडली आहेत, तर काही गडांना छत्रपती शिवाजी महाराजांनी नावं दिले आहे. सह्याद्रीमध्ये भटकंती करणाऱ्या मुंबई-पुण्यातील भटक्यांचे आवडते ठिकाण म्हणजे कर्जत. कारण कर्जतमधून वेगवेगळ्या गडांवर जाणाऱ्या असंख्य वाटा पाहायला मिळतात. … Read more

Sudhagad Fort; या गडाचा विचार शिवरायांनी राजधानीसाठी केला होता

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रायगड जिल्ह्यातील भोर संस्थानचे वैभव म्हणजे सुधागड (Sudhagad Fort) किल्ला. सुधागड किल्ला पूर्वी भोरपगड या नावाने प्रचलित होता. इसवी सन 1657-58 मध्ये भोरपगड (सुधागड) स्वराज्यात दाखल झाला. गड स्वराज्यात दाखल झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाचे नाव सुधागड ठेवले. घनदाट जंगल आणि विस्तीर्ण पठाराने व्यापलेला हा गड तिन्ही ऋतुमध्ये भटकंती … Read more