Subhanmangal Fort – स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा साक्षीदार किल्ले सुभानमंगळ

स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा साक्षीदार होण्याचे भाग्य Subhanmangal Fort ला लाभले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुभानमंगळ गडाचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुणे-सातारा-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नीरा नदीच्या काठी अखेरच्या घटका मोजत सुभानमंगळ हा भुईकोड गड उभा आहे. गडाची अवस्था अत्यंत दयनीय असून एका बाजूचा बुरूज पूर्णपणे ढासळलेला आहे. सुभानमंगळ आणि इतिहास पुणे जिल्ह्यातील शिरवळमध्ये नीरा … Read more

Tung Fort – लोणावळ्याच्या कुशीत वसलेला कठीण गड, एकदा आवर्जून भेट द्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात पुणे जिल्ह्याचे महत्त्व प्रचंड होते. मध्यवर्ती ठिकाण आणि शिवरायांच वास्तव्य पुणे जिल्ह्यात असल्यामुळे जिल्ह्याचा आसपासचा परिसर सुरक्षित ठेवणे गरजेचे होते. घाटमाथ्यावरून ये-जा करताना चौफेर लक्ष ठेवण्यासाठी शिवरायांनी राजगड, तोरणा या गडांसह अनेक छोटेमोठे गड घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी उभारले होते. स्वराज्याच्या उभारणीत या सर्व गडांचे विशेष योगदान आहे. या फळीतला एक गड … Read more

Bhairavgad Fort – अजस्त्र अभेद्य मोरोशीचा भैरवगड

मागच्या ब्लॉगमध्ये आपण चंदेरी गडाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. गगनाला भिडणारा चंदेरी दुरूनच आपल्याला आकर्षीत करतो. सुळक्या प्रमाणे त्या गडाची रचना आहे. चंदेरी पेक्षाही अवघड नव्हे तर, महाराष्ट्रातील सर्वात अवघड चढाई असलेल्या गड कोणता असं कोणी विचारलं तर हमखास भैरवगड-मोरोशी/Bhairavgad Fort या गडाचा उल्लेख केला जातो. भूगर्भशास्त्राच्या परिभाषेत असलेल्या डाईक रचनेनुसार या भैरवगडाची रचना आहे. … Read more

Chanderi fort – गगनाला भिडणारा चंदेरी, एक थरकाप उडवणारा गड

महाराष्ट्राच्या कडे कपाऱ्यांमध्ये अभेद्य आणि ढगांना भिडणारे काही मोजकेच गड आहेत. अशा गडांवर जाण्यासाठी काळीज वाघाचं पाहिजे. ज्यांना उंचीची भीती वाटते त्यांनी अंगातील भीती नाहीशी करण्यासाठी सहकाऱ्यांसोबत आवर्जून अशा गडांना भेट दिली पाहिजे. योगायोगाने आपल्या महाराष्ट्रात असे काही मोजके गड आहेत. तोरणा, गोरखकड, भैरवगड आणि Chanderi Fort हे त्यातली काही नावं. आयुष्याच्या या रंगमंचावर जगताना … Read more

Markandeya Fort – नाशिकचा मार्कंड्या, का पडलं गडाला असं नाव? वाचा सविस्तर…

मुंबई ठाणेमधून गडांवर जाणाऱ्या दुर्गवेड्या भटक्यांची संख्या मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये छोट्यामोठ्या गडांची संख्या जास्त आहे. तरीसुद्धा बऱ्याच गडांबद्दल आपल्याला माहिती नाही. गड कितीही छोटा असला तरी त्याला छोटा का होईना इतिहास असतोच. अशाच एका नाशिक जिल्ह्यातील अपरिचित गडाचा इतिहास आपण पाहणार आहोत. चल तर म सफर … Read more

Jangli Jaigad – घनदाट जंगलाने वेढलेला, काळजाचा थरकाप उडवणारा जंगली जयगड

सह्याद्री आणि महाराष्ट्राचं अतूट नातं साऱ्या जगाला माहित आहे. धडकी भरवणारं जंगल, काळजाचा थरकाप उडवणाऱ्या डोंगर रांगा, मायेने जवळ घेणार्‍या आणि वेळ पडलीच तर रौद्र रूप धारण करणाऱ्या नद्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडत आहेत. अशा कठीण परिस्थिती शिवरायांनी व मावळ्यांनी जीवाची बाजी लावून गड राखले, त्यांच्यावर जीव लावला वेळप्रसंगी प्राणांची आहुती दिली मात्र, गडाचं संरक्षण करण्यात … Read more

Dhakoba Fort – घाटांचा रक्षणकर्ता, सह्याद्रीतला दुर्लक्षीत पण देखणा गड

दिवाळी म्हटल की सर्वत्र दिव्यांची आरास, फराळांचा गोडवा आणि पै पाहुण्यांची तारांबळ पहायला मिळते. मात्र, या सर्व धावपळीत लहान मुलांसह तरुणांची लगबग सुरू होते, ती किल्ला कोणता बांधायचा या चर्चेने. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एखादा गड निवडायचा आणि बांधकामाला सुरुवात करायची. प्रत्येकाने आपल्या लहानपणी एकदा का होईना पण किल्ला हा बनवला असेलच. पण आपल्या महाराष्ट्रात … Read more

Ajoba Fort – लव-कुश यांचे जन्मस्थळ, का पडले आजोबा गड असे नाव? वाचा सविस्तर…

सह्याद्रीने महाराष्ट्रावर भरभरून प्रेम करत आला आहे. अनेक डोंगर रांगांनी महाराष्ट्राला वेढले आहे. सातपुडा पर्वतरांग, शंभू महादेव आणि हरिश्चंद्र बालाघाटची डोंगर रांग महाराष्ट्रात पहायला मिळते. सर्व डोंगररांगा विविधतेने नटलेल्या असून प्रत्येकाचे काही ना काही वैशिष्ट्य आहे. याच डोंगररांगांमध्ये नावाने आजोबा (Ajoba Fort) पण रुपाने कणखर असलेला गड बालाघाटच्या डोंगररांगांमध्ये थाट मानेने उभा आहे. बालाघाटच्या डोंगर … Read more

Rangana Fort – अल्लाहच्या कृपेने रांगणा ताब्यात आला, अस का म्हणाला महम्मद गावान? वाचा सविस्तर…

सह्याद्री, गडकिल्ले आणि निसर्गाची मुक्त उधळणं म्हटल की पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली आणि कोकण पट्ट्याचा आवर्जून उल्लेख केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात शत्रूला अस्मान दाखवण्यासाठी या जिल्ह्यांमध्ये छोट्या मोठ्या अनेक गडकिल्ल्यांची निर्मिती केली. आजही शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि मावळ्यांच्या बलिदानाची साक्ष देणारे हे गड थाट मानेने उभे आहेत. याच स्वराज्याच्या … Read more

साताऱ्याचा Bhairavagad Fort; इंग्रंज अधिकाऱ्याने या गडाचा उल्लेख आपल्या पुस्तकात केला होता

सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये भटकंती करणाऱ्या भटक्यांना Bhairavagad Fort म्हटले की, रायगड जिल्ह्यात असणारा अतिविराट, काळजाचा थरकाप उडवणारा मोरोशीचा भैरवगड हमखास आठवत असणार. परंतु महाराष्ट्रात फक्त एकच भैरवगड नाही. महाराष्ट्राच्या डोंगरदर्यांमध्ये एकूण 6 भैरवगड आहेत. प्रत्येक गडाचे आपापले वैशिष्ट्य आहे. या सर्वांमध्ये मोरोशीचा भैरवगड हा जास्त प्रचलित असून सह्याद्रीत भटकणाऱ्या दुर्गवेड्याचे मोरोशीचा भैरवगड सर करण्याचे स्वप्न … Read more