Disha Salian Case – दिशा सालियनची हत्या झाली? आतापर्यंत काय काय घडलं, कोणाची नावं आली चर्चेत; वाचा स्टेप बाय स्टेप

Disha Salian Case

दिशाचे सालियन हिच्या मृत्यूमुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा चिघळणार असल्याची शक्यता आहे. कारण दिशाचे वडील सतीश सालियन यांनी सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यासह अनेक व्यक्तींना अटक करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी दिशा सालियानचा मृत्यू कसा झाला? मृत्यू झाल्यानंतर तपास कशापद्धतीने पुढे सरकला? या सर्व गोष्टींची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत.

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन (वय २८ वर्ष) हिजे ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका उंच इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून दुःखद निधन झाले. त्यानंतर सातव्या दिवशी 14 जून 2020 रोजी बॉलिवूड अभिनेता सुशात सिंग राजपूत याचा मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही घटना एकमेकांशी रिलेटेड आहेत का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. दोघांच्याही मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली होती. प्रसार माध्यमांनी सुद्धा हा विषय उचलून धरला होता. आता पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे. आतापर्यंत या प्रकरणात काय काय घडलं हे जाणून घेऊयात.

दिशा सालियन कोण होती?

दिशा सालियन ही एक प्रसिद्ध जनसंपर्क व्यवस्थापक (PR) होती. तिने सुशांत सिंग राजपूत यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम केले होते. ८ जून २०२० च्या रात्री ती रोहन राय आणि मित्रांसोबत मालाड येथील एका उंच इमारतीत एका पार्टीसाठी गेली होती. या संदर्भात मिळालेल्या वृत्तानुसार, पार्टीदरम्यान दिशाचा काही कराणांवरुन वाद झाला. त्यानंतर दिशा एका खोलीत गेली आणि आतून दरवाजा बंद केला. त्यानंतर काही वेळातच, ती बाल्कनीतून पडली आणि तिचा मृत्यू झाला.

प्राथमिक तपास आणि निष्कर्ष

मुंबई पोलिसांनी दिशा सॅलियनच्या मृत्यूचा तपास सुरू केला आणि तो अपघाती मृत्यू असल्याचे तपासात सिद्ध झाले. सुरुवातीच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण पडल्यामुळे झालेल्या जखमांमुळे असल्याचे दिसून आले. तातडीने कोणत्याही प्रकारची घातपाताची चिन्हे आढळली नाहीत आणि पोलिसांनी पार्टीत उपस्थित असलेल्यांचे जबाब नोंदवले. दिशाच्या पालकांनीही तपासावर समाधान व्यक्त केले आणि सांगितले की त्यांना त्यांच्या मुलीच्या मृत्यूमध्ये कोणताही घातपात असल्याचा संशय नाही. त्यामुळे हे प्रकरण शांत झाले होते. 

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंध

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी दिशा सॅलियनच्या मृत्यूची जवळीक असल्याने उलट सुलट चर्चांना उधान आले होते. वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात होते. काही व्यक्तींनी दोन्ही मृत्यूंमध्ये संबंध असल्याचा आरोप केला, ज्यामुळे दिशाचा मृत्यू अपघाती नव्हता आणि तो सुशांतच्या मृत्यूशी त्याचा संबंध असावा, अशा चर्चा सुरू झाल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या सर्व गोष्टींना मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले, जाब विचारण्यात आला. लोकांच्या या प्रकरणात सहभाग पाहता पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली.

राजकीय आरोप आणि घडामोडी

दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूनंतर अनेक राजकीय व्यक्ती यात उडी मारून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. तसेच विविध आरोप सुद्धा करण्यात आले. त्याचा तपास अजूनही सुरू आहे. 

नितेश राणे यांचे आरोप – भाजप आमदार नितेश राणे यांनी असा दावा केला की दिशा सालियनचा मृत्यू आत्महत्या किंवा अपघात नव्हता तर खून होता. त्यांनी आरोप केला की शिवसेना (उबाठा) आदित्य ठाकरे, या घटनेत सामील होते. त्याचबरोबर नितेश राणे यांनी महाविकास आघाडीने (MVA) सत्तेत असताना संबंधितांना वाचवण्यासाठी प्रकरण लपवण्याचा आरोप केला.

एसआयटीची स्थापना – सतत होणाऱ्या आरोपांमुळे आणि वाढत चाललेल्या सार्वजनिक दबावामुळे अखेर डिसेंबर २०२३ मध्ये, महाराष्ट्र सरकारने दिशा सालियनच्या मृत्यूची पुनर्तपासणी करण्यासाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. विविध पक्षांनी उपस्थित केलेल्या चिंता दूर करण्यासाठी आणि सखोल चौकशी सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला. 

नितेश राणे यांना सूचना – जुलै २०२४ मध्ये, मुंबई पोलिसांनी नितेश राणे यांना नोटीस बजावली, ज्यामध्ये त्यांना त्यांच्यासमोर हजर राहण्यास आणि दिशा सालियनच्या मृत्यूबाबत त्यांच्याकडे असलेली कोणतीही माहिती शेअर करण्यास सांगितले. 

नुकत्याच घडलेल्या घडामोडी

शांत झालेलं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत का आलं. 

दिशा सालियनच्या वडिलांची याचिका – दिशाचे वडील सतीश सालियन यांनी सामूहिक बलात्कार आणि हत्ये प्रकरणी एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यासह अनेक व्यक्तींना अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. याचिकेत असा आरोप आहे की, दिशाकडे अशी माहिती होती जी गुन्हेगारी प्रकरणे उघड करू शकत होती आणि त्यामुळेच तिची हत्या करण्यात आली, असा आरोप दिशाच्या वडिलांनी केला आहे. 

फॉरेन्सिक पुरावे – दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत प्राथमिक तपासात विसंगती दर्शविणारे फॉरेन्सिक पुरावे सादर केले आहेत. त्यात असा आरोप आहे की, अपघाताच्या ठिकाणी कोणतेही रक्ताचे डाग नव्हते, एवढ्या उंचीवरून पडल्याशी जुळणारे कोणतेही फ्रॅक्चर किंवा जखमा शरीरावर नाहीत आणि दिशाचे शरीर शाबूत होते. 14 व्या मजल्यावरुन एखादी व्यक्ती पडल्यास शरीराचे जी अवस्था होती, तशी दिशाची झाली नव्हती. 

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचा दुवा – याचिकेत दिशाच्या मृत्यूचा आणि सुशांत सिंग राजपूतच्या त्यानंतरच्या मृत्यूचा संबंध देखील स्थापित केला आहे. त्यात असा दावा आहे की, सुशांतला दिशाच्या मृत्यूच्या सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव होती आणि त्याला स्वतःच्या जीवाची भीती होती, ज्यामुळे वर्तनात बदल झाले आणि गुन्हा उघड करण्याची योजना आखली गेली, ज्यामुळे त्याची हत्या झाल्याचा आरोप आहे. 

लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या भारताचा समावेश विकसनशील देशांच्या यादीमध्ये केला जातो. एकीकडे भारताचा विकास प्रगतीपथावर आहे, तर दुसरीकडे गुन्हेगारीमध्ये त्याच वेगाने वाढ होत आहे. भारातमध्ये दररोज बलात्कार, छेडछाड, चोरी, दरोडे, घाटाळे आणि खूनाच्या घटना घडत आहेत. या घटनांचा समाजावर खोलवर परिणाम होताना दिसत आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न भारतामध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, कायदा कठोर करण्यात यावा, अशी मागणी वारंवार नागरिकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटना घडल्या आहेत. या घटना – वाचा सविस्तर – Murder Cases in India – जेसिका लाल ते बुरारी, भारताला हादरवून टाकणारे हत्याकांड

सार्वजनिक दबाव आणि माध्यमांचा प्रतिसाद

दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांचे मृत्यू हे जनहिताचे आणि माध्यमांच्या तपासाचे विषय राहिले आहेत. असंख्य वृत्तसंस्था, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि स्वतंत्र तपासकर्त्यांनी या प्रकरणांचे विविध दृष्टिकोन शोधणे सुरू ठेवले आहे, अनेकदा महत्त्वाचे मुद्दे सादर केले आहेत. यामुळे सार्वजनिक चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. काही जण पुढील तपासाची माहिती घेत आहेत, तर काहीजण पडताळणी न केलेल्या आरोपांविरुद्ध सावधगिरी बाळगत आहेत.

कायदेशीर कार्यवाही आणि आव्हाने

दिशा सालियनच्या मृत्यूशी संबंधित कायदेशीर कार्यवाही अनेक आव्हानांना तोंड देत आहेत:

न्यायालयीन मुद्दे – हाय-प्रोफाइल व्यक्तींचा सहभाग आणि राजकीय हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे तपास प्रक्रिया गुंतागुंतीची झाली आहे, ज्यामुळे निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय एजन्सीच्या सहभागाची मागणी होत आहे.

पुराव्यांची चिंता – नवीन फॉरेन्सिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीमुळे सुरुवातीच्या तपासाच्या परिपूर्णतेबद्दल आणि महत्त्वाच्या पुराव्यांच्या हाताळणीबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत.

माध्यमांचा प्रभाव – व्यापक माध्यम कव्हरेजमुळे संभाव्य विसंगतींकडे लक्ष वेधण्यात मदत झाली आहे आणि पडताळणी न केलेल्या माहितीचा प्रसार होण्यास हातभार लागला आहे, सार्वजनिक धारणा प्रभावित झाली आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेवर संभाव्य परिणाम झाला आहे.

दिशा सालियनचे प्रकरण एक गुंतागुंतीचा विषय आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये याचा काय निकाल लागणार हे पहावं लागले. 

error: Content is protected !!