मराठी विशेष
Satara News – जमिनीचा सातबारा, घरांवर पुरुषांच्या बरोबरीने महिलांची नावे; गजवडी गावाच्या ऐतिहासिक उपक्रमाची राज्यात चर्चा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक भूमी म्हणजे सातारा जिल्हा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात जिल्ह्याने पुढाकार घेतला. पुस्तकांच गाव, मधाचं गाव, यंदाच्या वर्षातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण सुद्धा याच सातारा जिल्ह्यात आहे. आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील सज्जनगडाच्या पायथ्याला असलेल्या गजवडी गावाच्या ऐतिहासिक उपक्रमामुळे जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. जमीन असो अथवा … Read more
Satara News – देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना लष्कराच्या जवानाने गंडा घातला, पावणे चार लाखांची फसवणूक; पोलिसांनी बेड्या ठोकल्या
फौजींचा जिल्हा म्हणून साताऱ्याचा (Satara News) साऱ्या जगात नावलौकिक आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक तरी व्यक्ती देशाच्या सेवेसाठी सीमेवर कार्यरत आहे किंवा सैन्यात भरती होण्याची तयारी करत आहे. असचं देशसेवेचं स्वप्न दोन तरुणांनी उराशी बाळगलं होतं. भरतीची वय मर्यादा ओलांडण्याचे शेवटचे वर्ष असल्यामुळे क्लर्क पदावर भरती होण्यासाठी रितेश वे त्याचा भाऊ आयुष जाधव यांनी आरोपी … Read more
Tennis Cricket News – 22 यार्ड क्रिकेट कार्निव्हल स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला ‘वाई 11’
22 Yard Cricket Carnival या रबर बॉल क्रिकेट (Tennis Cricket News) स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरलाय ‘वाई 11’. नवी मुबंईतील कोरपखैरणेमध्ये असलेल्या भूमीपुत्र मैदानामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 8 संघांचा दोन दिवस थरार रंगला. रविवारी (21 सप्टेंबर 2025) पार पडलेल्या अंतिम सामन्यात वाई 11 विरुद्द कोयना किंगस्टार असा सामना रंगला. या सामन्यात वाईने बाजी मारली आणि 36 … Read more
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांची धावपळ थांबणार; गावाजवळच्या CSC केंद्रांवर मिळणार माफक दरात सेवा
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ सोबत एक सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता महामंडळाच्या (Annasaheb Patil Economically Backward Development Corporation ) विविध योजनांचा लाभ CSC केंद्रामध्ये घेता येणार आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे आणि CSC सोबत केलेल्या सामंजस्य करारामुळे योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल. तसेच ग्रामीण भागातील तरुणांच्या वेळेची आणि … Read more
Surekha Yadav- आशिया खंडातल्या पहिल्या महिला रेल्वे चालक आणि सातारची लेक सुरेखा यादव निवृत्त होणार
आशिया खंडातल्या पहिल्या महिला रेल्वे चालक मराठमोळ्या सुरेखा यादव (Surekha Yadav) या 36 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. Central Railway ने आपल्या सोशल मीडियावर त्यांचे काही खास फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सुरेखा यादव यांचा प्रवास भारतीय रेल्वेमध्ये महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून कायम ओळखला जाईल, असही पोस्टमध्ये म्हटलं … Read more
Navratri 2025 – भक्तांसाठी ST महामंडळाची झकास योजना, साडेतीन शक्तिपीठाचे दर्शन घेता येणार; जाणून घ्या सविस्तर
सोमवारी (22 सप्टेंबर 2025) नवरात्रोत्सवाला (Navratri 2025) सुरुवात होणार आहे. त्यामुळे महिलांसह सर्वांचीच सध्या लगबग सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्व देवींची मंदिरे भक्तांनी फुलून निघणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठ आहेत. त्यामुळे साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घेण्याची सर्वांचीच इच्छा असते. परंतु वेळ आणि पैशांची गणित जुळवताना सामान्यांची तारांबळ उडते. यासाठीच आता … Read more
Court News – वकिलाच्या पुढाकाराने 12 वर्षांनी दाम्पत्य पुन्हा एकत्र, दगडुशेट गणपतीचं दर्शन घेत नवीन आयुष्याला सुरुवात
मागील काही वर्षांमध्ये घटस्फोटांच्या प्रमाणात वेगाने वाढ झाली आहे. अनेक संसार यामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम होत असल्याचे एका अभ्यासातून दिसून आलं आहे. पुण्यातील एक दाम्पत्य सुद्धा या सर्व प्रक्रियेतून जात होतं. कमल आणि सुरेश (बदलेली नावे) यांच्यात मागील 12 वर्षांपासून न्यायालयीन (Court News) लढाई सुरू होती. अखेर वकिलांच्या एका वाक्यामुळे या … Read more
Satara News – बाप-लेकाची एकमेकांना कडकडून मिठी; चार वर्षांचा अबोला लोकन्यायालयात संपुष्टात, न्यायाधिशांचे डोळेही पाणावले
कराडमध्ये बाप-लेकाच्या नात्यात पुन्हा एकदा नवी पालवी फुटली आहे. लोकन्यायालयाच्या निमित्ताने दोघेही तब्बल चार वर्षांनी एकत्र आले आणि आपापली चूक मान्य करत एकमेकांना कडकडून मिठी मारली. मागील चार वर्षांत बाप-लेकाने एकमेकांच तोंडही पाहिलं नाही, दोघांमाधला वाद इतका विकोपाला गेला होता. दोघांनी एकमेकांच्या विरोधात फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल केले होते. परंतु आता दोघांनी सर्व खटले … Read more
Reliance Foundation Scholarship – 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, जाणून घ्या पात्रता आणि फायदे
रिलायन्स फाउंडेशनच्या (Reliance Foundation Scholarship) माध्यमातून 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी Reliance Foundation Undergraduate Scholarships 2025-26चा पर्याय खुला झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे, अशा विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीमुळे चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता, फायदे आणि कागदपत्रे कोणती लागणार याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ. … Read more