Trending Marathi – 8 वर्षांनी हरवलेल्या मुलाची आणि आईची भेट झाली, पोलिसांसह सर्वांचेच डोळे पाणावले; पाहा Video

Trending Marathi बीड पोलिसांनी 8 वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाची आणि आईची भेट घडवून दिली आहे. 2017 साली वयाच्या 16 व्या वर्षा संबंधित मुलगा हरवला होता. त्यानंतर हरवल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. परंतु त्याचा काही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे आई वडीलांनी मुलगा परत मिळण्याची आशा सोडून दिली होती. परंतु पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे तब्बल … Read more

Balkawadi Dam – बलकवडी धरणाचा डोळ्यांचे पारणे फेडणारा हा Video पाहिलात का!

सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या वाई तालुक्यातील बलकवडी धरण (Balkawadi Dam) परिसर शांततेमुळे आणि निसर्गाच देखण्या रुपामुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळे वाईसह मुंबई पुण्यातून अनेक पर्यटक बलकवडी धरणाला भेट देत असतात. वाई तालुक्याच्या पर्यटनासाठी विशेष मेहनत घेणारे वैभव जाधव यांनी आपल्या बलकवडी धरण परिसराचा सुंदर नजारा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. त्याचा व्हिडीओ त्यांनी wai_tourism_official या इन्स्ट्राग्राम पेजवर … Read more

Satara Vishesh – पत्नीशी भांडण झालं, 24 वर्षीय तरुणाने अजिंक्यताऱ्यावर जीवन संपवण्याचा केला प्रयत्न

सातारा (Satara Vishesh) जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर एका 24 वर्षीय तरुणाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी शिताफीने त्याची समजून काढल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (7-08-2025) दुपारी 4 च्या दरम्यान सदर घटना घडली आहे. किल्ले अजिंक्यतारा … Read more

Uttarakhand Cloudburst – जीवंतपणी मृत्यू पाहिला अन् डोळ्यादेखत सहकारी वाहून गेले…; जवानाने सांगितला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग

उत्तराखंडमधील (Uttarakhand Cloudburst) उत्तरकाशीतील धराली येथे दोन दिवसांपूर्वीच ढगफुटीचे संकट कोसळले. अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे डोंगरातून दगड, माती, चिखलासह आलेल्या लोंढ्यांमुळे अख्खे गाव वाहून गेले. या नैसर्गिक आपत्तीत ११ जवानांसह ७० जण बेपत्ता झाले असून त्यांचे बचावकार्य सुरू आहे. या अतिवृष्टीमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आलेल्या जवानांमधील एक जवान या घटनेतून सुखरुप बचावला. मात्र यावेळी त्याने अनुभवलेला … Read more

Deepthi Jeevanji – लोकांनी हिनवलं, चिढवलं पण तीने हार मानली नाही, आपल्या नावाचा जगात डंका वाजवला; पण बऱ्याच जणांना माहितच नाही

Deepthi Jeevanji भारताच्या क्रीडा क्षेत्रातलं सध्या चर्चेत असलेलं पण बऱ्याच जणांना माहित नसलेलं नाव. Paris Paralympics मध्ये तिने महिलांच्या 400 मीटर टी20 फायनलमध्ये 55.82 सेकंदाची वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावले होते. दीप्तीने पटाकवेलं हे कांस्यपदक साऱ्या देशाला प्रेरणा देणारं ठरलं. संपूर्ण भारतात तिच्या नावाची जोरदार चर्चा झाली. ज्या लोकांनी तिला तिच्या दिसण्यावरून वारंवार हिणवलं तेच लोकं तीचं … Read more

Mahila Samriddhi Yojana – ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगारास प्रोत्साहन मिळणार! कसा होणार फायदा? वाचा…

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हे देशाच्या समृद्धीचे एक महत्त्वाचे अंग आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. बऱ्याच क्षेत्रांमध्ये महिलांच्या हाताखाली पुरुष काम करत आहेत. बऱ्याच महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यश संपादित केलं आहे. मात्र या सर्व प्रक्रियेत आजही ग्रामीण भागातील महिला काही प्रमाणात पिछाडीवर आहेत. पुरेशा माहितीचा … Read more

Railway Job Vacancy – रेल्वेत 6,238 टेक्निशियन पदांसाठी भरती, आजच आहे शेवटची तारीख; लगेच अर्ज करा

रेल्वेमध्ये (Railway Job Vacancy) 6 हजार 238 पदांसाठी बंपर भरती केली जाणार आहे. त्यामुळे रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तात्काळ अर्ज करण्यासाठी लगबग करायची आहे. कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025 ही होती. परंतु ती 7 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आली होती. म्हणजेच आजच या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तात्काळ अर्ज … Read more

Satara Vishesh – रक्षाबंधननिमित्त सातारकरांना एसटी महामंडळाचा दिलासा, जादा बस सोडणार; जाणून घ्या तारखांची यादी

रक्षाबंधनानिमित्त सातारकरांची (Satara Vishesh) गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागामार्फत सर्व 11 आगारातून जादा बस सोडल्या जाणार आहेत. 9 तारखेला रक्षाबंधन असल्यामुळे मोठ्या संख्येने सर्व मंडळी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा मुंबई-पुणेमध्ये जात असतात. या सर्व गोष्टींचा विचार करून जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. विशेष करून मुंबई, पुणे, ठाणे आणि … Read more

Lakhpati Didi Yojana – ग्रामीण महिलांना उंच भरारी घेण्यास मदत होणार! आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग, जाणून घ्या एका क्लिकवर

ग्रामीण भागातील महिलांनी गेल्या काही वर्षांमध्ये चांगली प्रगती केली आहे. विविध क्षेत्रांमध्ये महिला आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविका, आशा वर्कर्स, महिला बचत गट अशा विविध पदांवर कार्य करताना महिलांना एकमेकींच्या सोबतीने आपापला विकास करण्यास प्राधान्य दिलं आहे. फक्त स्वत:पुरता विचार न करता गावाच्या विकासातही महिलांचा खारीचा वाटा आहे. ग्रामीण भागामध्ये राहून आपल्या … Read more

भाऊ मी तुला आता राखी बांधू शकणार नाही… सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने जीवन संपवलं

बहिण-भावाच्या नात्यातला गोडवा निर्माण करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. बहिण-भाऊ एकमेकांशी कितीही भांडले तरी रक्षाबंधनच्या दिवशी अगदी हक्काने बहिण भावाला राखी बांधतेच आणि भाऊ सुद्धा राखी बांधून घेतो. अवघ्या काही दिवसांवर बहिण भावाच्या नात्याला आकार देणारा हा सण आला आहे. देशभरात उत्साहात हा सण साजरा केला जाईल. परंतु एक बहिण मात्र या रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी … Read more

error: Content is protected !!