Pandavgad Fort; विराटनगरी वाईचा पहारेकरी

इतिहासाच्या पानांवर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याचं नावं सुवर्ण अक्षरांनी लिहीण्यात आले आहे. आजही इतिहासाच्या पाऊलखुणा वाईमध्ये आढळून येतात. वाईला प्रामुख्याने मंदिरे, गडकिल्ले, कृष्णा नदी आणि सह्याद्रीची विस्तीर्ण रांगेने वेढलेले आहे. वाई व खंडाळा तालुक्यांदरम्यान शंभु महादेव डोंगर रांगांमध्ये येरूळी, वेरूळी, मांढरदेव, बालेघर, धामणा आणि हरळी या प्रमुख डोंगरांचा समावेश आहे. याच शंभु महादेवाच्या डोंगर रांगेमध्ये … Read more

Vairatgad Fort; वाईचा पाठीराखा, सतीशिळा असणारा गड

सातारा जिल्ह्यातील सर्वच जिल्ह्यांना ऐतिहासिक महत्व लाभलं आहे. परंतु या सर्व जिल्ह्यांमध्ये वाईच नाव प्रथम क्रमांकावर घ्यावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. ढोल्या गणपतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वाईमद्ये मराठी विश्वकोश कार्यालय आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण वाईतील मेणवलीच्या घाटावर आणि ढोल्या गणपतीच्या परिसरात होत असतं. ऐतिहासीक महत्व लाभलेल्या या वाई शहराचा पाठीराखा … Read more

Irshalgad Fort; भूस्खलनामुळे प्रकाशझोतात आलेला गड, दुर्घटनेची वर्षपूर्ती

मागच्या वर्षी जुलै महिन्यात (2023) दु:खद घटना घडली आणि पाहता पाहता इर्शाळगडावर (Irshalgad Fort) असणारी इर्शाळवाडी दरड कोसळल्याने नेस्तनाबूत झाली. 70 हून अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला, तर असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली. जुलै महिन्यात या भयंकर दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होतील. त्यामुळे सर्वप्रथन या दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. रायगड जिल्ह्यात माथेरानच्या डोंगररागांमध्ये आणि खालापूर तालुक्यामध्ये … Read more

Sondai Fort; मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या आसपास आणि माथेरानच्या डोंगररांगांमध्ये असंख्य गडकिल्ले थाटात वसले आहेत. या सर्व गडांचे आपापले वैशिष्ट्य आहे. काही गडांची नावे ही गडावरील देवीच्या नावाने पडली आहेत, तर काही गडांना छत्रपती शिवाजी महाराजांनी नावं दिले आहे. सह्याद्रीमध्ये भटकंती करणाऱ्या मुंबई-पुण्यातील भटक्यांचे आवडते ठिकाण म्हणजे कर्जत. कारण कर्जतमधून वेगवेगळ्या गडांवर जाणाऱ्या असंख्य वाटा पाहायला मिळतात. … Read more

Sudhagad Fort; या गडाचा विचार शिवरायांनी राजधानीसाठी केला होता

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रायगड जिल्ह्यातील भोर संस्थानचे वैभव म्हणजे सुधागड (Sudhagad Fort) किल्ला. सुधागड किल्ला पूर्वी भोरपगड या नावाने प्रचलित होता. इसवी सन 1657-58 मध्ये भोरपगड (सुधागड) स्वराज्यात दाखल झाला. गड स्वराज्यात दाखल झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाचे नाव सुधागड ठेवले. घनदाट जंगल आणि विस्तीर्ण पठाराने व्यापलेला हा गड तिन्ही ऋतुमध्ये भटकंती … Read more

Peb fort information in Marathi; कड्यावरच्या गणपतीसाठी प्रसिद्ध असणारा किल्ला

सह्याद्रीने महाराष्ट्राला भरभरुन दिले आहे. धबधबे, गडकिल्ले, डोंगररांगा, नद्या शब्द अपुरे पडतील ऐवढी निसर्ग संपदा या सह्याद्रीमुळे महाराष्ट्राला लाभली आहे. त्यामुळेच ऊन, वारा आणि पाऊस याचा विचार न करता सह्याद्रीमध्ये भटकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रामुख्याने गडकिल्ल्यांवर जाणाऱ्या तरुणाईची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये मुंबई,नवी मुंबई, पुणे आणि ठाणेकरांसाठी जवळ असणारा … Read more

Top 10 Forts in Maharashtra in Marathi ; मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे किल्ले

पावसाळा सुरू झाला की भटक्यांना वेध लागतात ते सह्याद्रीच्या कुशीत बागडण्याचे आणि गडकिल्ल्यांच्या सहवासात रमण्याचे. निसर्गाची मुक्त उधळण महाराष्ट्राच्या कडेकपारींमध्ये पाहायला मिळते. वेगवेगळी फुले, प्राणी, कीटक इत्यादी घटकांची नव्याने ओळख होते. कामाच्या व्यापातून वेळ काढत सुट्टीचा एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवण्यासाठी तरुण तरुणींची लगबग सुरू होते. त्यानंतर असंख्य प्रश्न मनात निर्माण होतात. जसे की कोणत्या … Read more

रायरेश्वर किल्ला / Raireshwar Fort Information In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज म्हटल की महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हटल की गडकिल्ले. बाप जस आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीर उभा असतो तसेच या गडकिल्ल्यांच्या पाठीशी सह्याद्री उभा आहे. याच सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर शिवरायांच आणि त्यांच्या सवंगड्यांच बालपण गेल. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आणि सह्याद्रीच्या कुशीत शिवराय खेळले, बागडले आणि स्वराज्याची शपथ सुद्धा त्यांनी या सह्याद्रीच्या कुशीतच घेतली. रायरेश्वरास … Read more

कमळगड किल्ला/Kamalgad fort Information In Marathi

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला ऐतिहासीक महत्व आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला गडकिल्ले आणि सह्याद्रीचे अविरत प्रेम लाभले आहे. याच सह्याद्रीच्या कुशीत रुबाबात वसलेला कमळपुष्पाच्या आकाराचा कमळगड (Kamalgad fort Information In Marathi). सह्याद्रीचा फ्रीज म्हणून या किल्ल्याचा नावलौकिक जगभर आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात या किल्याचे वास्तव्य पाहायला मिळतं. चहुबाजूंनी घनदाट जंगलांनी या किल्याला वेढलेल … Read more