पावसाळा सुरू झाला की निसर्गाच्या सानिध्यात भटकण्याची ओढ लागते. मुंबई आणि पुण्याहून साताऱ्यातील (Satara Vishesh ) वाई, पांचगणी आणि महाबळेश्वरला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये सुद्धा पावसाळ्यात झपाट्याने वाढ होते. परंतु या अल्हाददायक वातावरणाचा आनंद घेताना दु:खद घटना सुद्धा घडतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पर्यटन स्थळे 20 जून पासून 19 ऑगस्टपर्यंत बंद असणार आहेत. तसा आदेश लागू करण्यात आला आहे.
निर्बंध लावण्यात आलेली पर्यटन स्थळे
- अजिंक्यतारा किल्ला
- ठोसेघर धबधबा
- वजराई धबधबा
- एकीव धबधबा
- केरळली-सांडवली धबधबा
- कास तलाव
- कास पठार
- बामनोली
- ओझर्डे धबधभा
- घाटमाथा धबधबा
- सडावाघापूर उटला धबधबा
- लिंगमळा धबधबा
- रुद्रेश्वर देवालय धबधबा
- ऊरुल घाट शिव मंदिर धबधबा
- पंचकुंड धबधबा
महाबळेश्वर आणि पांचगणी फिरायला येणारे पर्यटक मोठ्या संख्येने वरील सर्व ठिकाणांना आवर्जून भेट देतात. परंतु सध्या पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. आणि पुढील काही दिवासांमध्ये पाऊस मुसळधार कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही सर्व पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत.