Jangli Jaigad – घनदाट जंगलाने वेढलेला, काळजाचा थरकाप उडवणारा जंगली जयगड

सह्याद्री आणि महाराष्ट्राचं अतूट नातं साऱ्या जगाला माहित आहे. धडकी भरवणारं जंगल, काळजाचा थरकाप उडवणाऱ्या डोंगर रांगा, मायेने जवळ घेणार्‍या आणि वेळ पडलीच तर रौद्र रूप धारण करणाऱ्या नद्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडत आहेत. अशा कठीण परिस्थिती शिवरायांनी व मावळ्यांनी जीवाची बाजी लावून गड राखले, त्यांच्यावर जीव लावला वेळप्रसंगी प्राणांची आहुती दिली मात्र, गडाचं संरक्षण करण्यात … Read more

Bhushangad Fort – खटाव तालुक्याच भूषण, किल्ले भूषणगड

Bhushangad Fort म्हणजे खटाव तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेला गड. ग्रामस्थांच्या पुढाकाराने गडाचा संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे. या भूषणगडाचे वैशिष्ट्य म्हणजे खटाव तालुक्यात दुरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात भूषणगडाचा एकमेव डोंगर अगदी उठून दिसतो. गावकाऱ्यांनी पुढाकार घेत गडावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. त्याच गडावर आणि गडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण केले आहे. त्यामुळे भूषणगड खटाव तालुक्याचे … Read more

Chanderi fort – गगनाला भिडणारा चंदेरी, एक थरकाप उडवणारा गड

महाराष्ट्राच्या कडे कपाऱ्यांमध्ये अभेद्य आणि ढगांना भिडणारे काही मोजकेच गड आहेत. अशा गडांवर जाण्यासाठी काळीज वाघाचं पाहिजे. ज्यांना उंचीची भीती वाटते त्यांनी अंगातील भीती नाहीशी करण्यासाठी सहकाऱ्यांसोबत आवर्जून अशा गडांना भेट दिली पाहिजे. योगायोगाने आपल्या महाराष्ट्रात असे काही मोजके गड आहेत. तोरणा, गोरखकड, भैरवगड आणि Chanderi Fort हे त्यातली काही नावं. आयुष्याच्या या रंगमंचावर जगताना … Read more

Mahimangad – माण तालुक्याचा अभिमान, साताऱ्याच्या संरक्षणासाठी शिवरायांनी महिमानगड ताब्यात घेतला

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचा अभिमान म्हणजे Mahimangad होय. सातारा-पंढरपूर रस्त्यावर अगदी थाटात उभा असणारा महिमानगड ताशीव कातळ कड्यांमुळे आपलं लक्ष वेधून घेतो. माण तालुका आणि परिसरातील अनेक दुर्ग मुख्य डोंगर रांगेपासून वेगळे झाले असून वेगवेगळ्या डोंगरावर विराजमान झाले आहेत. महिमानगडाच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासारखी आहेत. माण तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, … Read more

Sudhagad Fort; या गडाचा विचार शिवरायांनी राजधानीसाठी केला होता

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रायगड जिल्ह्यातील भोर संस्थानचे वैभव म्हणजे सुधागड (Sudhagad Fort) किल्ला. सुधागड किल्ला पूर्वी भोरपगड या नावाने प्रचलित होता. इसवी सन 1657-58 मध्ये भोरपगड (सुधागड) स्वराज्यात दाखल झाला. गड स्वराज्यात दाखल झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाचे नाव सुधागड ठेवले. घनदाट जंगल आणि विस्तीर्ण पठाराने व्यापलेला हा गड तिन्ही ऋतुमध्ये भटकंती … Read more

Jawlya fort- दिलेरखानाला मराठ्यांनी झुंजवलं होतं, वाचा जावळ्या गडावरचा थरार…

चंदन-वंदन या जुळ्या गडांची माहिती तुम्ही वाचली असेलच. साताऱ्यातील जुळी भावंड म्हणून इतिहासात त्यांची नोंद आहे. याव्यतिरिक्त अनेक जुळे गड महाराष्ट्राच्या मातीत आहेत. याच जुळ्या गडांमधला गड म्हणडे रवळ्या आणि Jawlya fort. नाशिक जिल्ह्यात सातमाळा रांगेत या गडांचे वास्तव्य आहे. जावळ्या गड रवळ्या गडाच्या तुलनेच चढण्यास सोपा आहे. मात्र मुक्काम केल्यास रवळ्या आणि जावळ्या हे … Read more

Prabalgad Fort – प्रबळगडाच्या शेजारी असणारा कलावंतीण दुर्ग आहे की सुळका? जाणून घ्या सविस्तर…

नवी मुंबई आणि मुंबई या प्रगतशील शहरांपासून अगदीच हाकेच्या अंतरावर असणारे Prabalgad Fort आणि kalavantin fort हे दुर्गप्रेमींच्या रडारवर असणारे गड. मात्र, या दोन्हींमध्ये बऱ्याच जणांचा सतावणारा प्रश्न म्हणजे, कलावंतीण हा दुर्ग आहे की सुळका? प्रबळगड आणि कलावंतीण हे दोन्ही बाजूबाजूला आहेत. त्यामुळे एकाच फेरीत दोन्ही गडांना भेट देता येते. मुंबई आणि नवी मुंबई पासून … Read more

Torna Fort – अतिदुर्गम व अतिविशाल गरुडाच घरटं, स्वराज्याचे तोरण

छत्रपती शिवाजी महाराजांनी नामकरण केलेल्या काही मोजक्या गडांमध्ये Torna Fort चा उल्लेख आवर्जून केला जातो. गरूडाच घरटं या नावाने सुद्धा हा गड ओळखला जातो. अतिदुर्गम व अतिविशाल असलेला तोरणा दुर्गवेड्यांच्या आवडीचा गड. गडाची चढण कितीही कठीण असली तरी, आजही मोठ्या संख्येने दुर्गप्रेमी तोरणा गडाला आवर्जून भेट देतात. घनदाट जंगलांनी वेढलेला हा गड सह्याद्रीच्या रांगेतील एका … Read more

Irshalgad Fort; भूस्खलनामुळे प्रकाशझोतात आलेला गड, दुर्घटनेची वर्षपूर्ती

मागच्या वर्षी जुलै महिन्यात (2023) दु:खद घटना घडली आणि पाहता पाहता इर्शाळगडावर (Irshalgad Fort) असणारी इर्शाळवाडी दरड कोसळल्याने नेस्तनाबूत झाली. 70 हून अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला, तर असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली. जुलै महिन्यात या भयंकर दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होतील. त्यामुळे सर्वप्रथन या दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. रायगड जिल्ह्यात माथेरानच्या डोंगररागांमध्ये आणि खालापूर तालुक्यामध्ये … Read more

Daulatabad Fort – भारतीय इतिहासाचा एक गौरवशाली चमत्कार, देवांचा किल्ला

महाराष्ट्रातील शंकूच्या आकाराच्या टेकडीवर वसलेला, Daulatabad Fort हा भारताच्या समृद्ध स्थापत्य आणि लष्करी वारशाचा दाखला आहे. “अभेद्य किल्ला” किंवा “देवांचा किल्ला” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दौलताबादने शतकानुशतके इतिहासकार, प्रवासी आणि वास्तुविशारदांना मोहित केले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वायव्येस अंदाजे 16 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला भव्यता, महत्त्वाकांक्षा आणि लवचिकतेची कथा सांगतो. दौलताबाद किल्ला त्याच्या अद्वितीय रचना आणि … Read more