Satara News – पाऊले चालती मंत्रालयाची वाट… लाडक्या बहिणींचा नीरा नदी पुलावर दंडवत; कुसगांव, एकसर, व्याहळी ग्रामस्थ आक्रमक

गावकऱ्यांच्या जमिनीवर जबरदस्तीने सुरू असलेले खान क्रशर बंद करण्यात यावेत, या मागणीसाठी सातारा (Satara News) जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कुसगांव, एकसर आणि व्याहळी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बेकायदेशीर क्रशरचा परवाना जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत मुंबईच्या दिशेने आंदोलन सुरूच राहणारा असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. गेले तीन दिवस झाले ग्रामस्थांच आंदोलन सुरू आहे. मुंबईच्या दिशेने … Read more

Wai Crime – भरदिवसा दोन सदनिका फोडल्या, 19 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 15 लाख रुपये केले लंपास

Wai Crime वाई शहरातील गंगापुरीत भरदिवसा चोरीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सृष्टी अपार्टमेंटमधील दोन बंध घरांच्या दरवाजांचे कुलूप तोडून चोरट्यांनी 19 तोळे सोन्याची दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. जवळपास 14 लाख 90 हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशार धनाजी जरंडे (आसरे, वाई) आणि त्यांच्या पत्नी विनिता जरंडे हे … Read more

Wai News – वाई तालुक्याचं रनमशीन काळाच्या पडद्याआड; वाशिवलीच्या धीरजची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी

Wai News वाई तालुक्याचं रनमशीन म्हणून नावारुपाला आलेला धीरज ड्रायव्हर वाईकर याचा छकड्यावरून पडून अपघात झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्याच्या अचानक जाण्यामुळे तालुक्यातील बैलगाडा प्रेमींना मोठा धक्का बसला आहे. मनमिळाऊ स्वभावामुळे प्रचलित असणारा धीरज आता आपल्यात नसणार या भावनेने वाशिवली गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असून … Read more

Mahabaleshwar Crime – पाचगणीतल्या शाळेत भयंकर घडलं; वर्गमित्रांनीच केली विद्यार्थ्याची रॅगिंग, पँट काढून मारहाण करण्याची धमकी

Mahabaleshwar Crime आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आई-वडिलांचा आटापिटा सुरू असतो. त्यामुळे मुलांना घरापासून लांब ठेवणे असो किंवा महागड्या शाळेत प्रवेश मिळवून देणे असो. शक्य त्या सर्व गोष्टी आई-वडिलांच्या माध्यमातून मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी केल्या जातात. परंतु एवढं सगळं करूनही मुलांच्या सुरक्षिततेवरच गंडांतर येत असेल तर, मात्र मुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतं. कारण पाचगणीमधील एक … Read more

Wai News – वयगांवमध्ये शेताच्या बांधावर भरली अनोखी शाळा, विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी घेतला भात लावणीचा आनंद

Wai News पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली की, ग्रामीण भागांमध्ये शेतीच्या कामांची लगबग सुरू होते. गावाकडची मुलं अगदी उत्साहात शेतीच्या कामांमध्ये आई-वडिलांना मदत करत असतात. पंरतु शहरी भागातील मुलांना शेतीच्या कामांबद्दल अगदीच तुरळक माहिती असते किंवा काहीच माहिती नसते. त्यामुळे शहरातील मुलांना प्रत्यक्ष शेतात काम करण्याचा अनुभव घेता येत नाही. पण जेव्हा शाळा किंवा महाविद्यालये … Read more

Karad News – कराड पालिकेचा षटकार; स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पटकावला अव्वल क्रमांक, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

Karad News कराड पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशाच्या पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारतर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2024 राबविण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून कराड पालिकेने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तसेच एक प्रकारे पुरस्कार पटकावण्याचा षटकार मारला आहे. गुरुवारी (17 जुलै 2025) कराड पालिकेचा राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली येथे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात … Read more

Wai News – खेळता खेळता गळफास लागला आणि चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; जांब गावावर कोसळला दु:खाचा डोंगर

वाई (Wai News) तालुक्यातील जांब गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. असद कमरुद्दीन इनामदार या अकरा वर्षांच्या मुलाचा खेळता खेळता गळ्याला फास लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असून इनामदार कुटुंब हादरून गेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जांब गावातील कमरुद्दीन रशीद इनामदार हे पत्नी आणि दोन मुलांसह गावामध्ये वास्तव्याला आहेत. नेहमीप्रमाणे … Read more

Adv. Varsha Deshpande – साताऱ्याच्या लेकीचा UN कडून विशेष गौरव; इंदिरा गांधी, जेआरडी टाटानंतर असा मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि उद्योगपती जे. आर. डी टाटा यांच्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाचा प्रतिष्ठेचा UN Population Award पटकावण्याचा मान Adv. Varsha Deshpande यांना मिळाला आहे. अ‍ॅड. वर्षा देशपांडे या लेक लाडकी योजनेच्या प्रवर्तक आणि दलित महिला विकास मंडळाच्या संस्थापिका आहेत. अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी लोकसंख्या आणि प्रजनन आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान दिलं आहे. त्यांच्या या … Read more

Mahabaleshwar News – मोठी बातमी! महाबळेश्वरमार्गे पोलादपूरला जाणार असाल तर थांबा, आंबेनळी घाट 5 दिवसांसाठी बंद

महाबळेश्वरहून (Mahabaleshwar News) पोलादपूरला जाण्यासाठी आंबेनळी घाटातून प्रवास करावा लागतो. परंतु आंबेनळी घाटात दरड कोसळल्याची घटना घडल्यामुळे घाट पाच दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भात सुचना जारी केल्या आहेत. महाबळेश्वर पोलादपूर परिसरात पावसाची रिपरिप सुरूच असते. याच पावसामुळे आंबेनळी घाटातील पोलादपूर हद्दीत असलेल्या पायटा गावाजवळ गुरुवारी (10 जुलै … Read more

Satara Vishesh – जावळी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, पण त्याचे निकष माहित आहेत का? वाचा…

Satara Vishesh अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच सर्व गणित बिघडून गेलं आहे. मे महिन्यापासून पावसाची सतत संततधार सुरू आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. संततधार पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे पेरण्याच झाल्या नाहीत. सरकारने या सर्व गोष्टीचा गांभिर्याने विचार केला पाहिजे आणि तात्काळ ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, अशी मागणी “आम्ही … Read more

error: Content is protected !!