साताऱ्याचा Bhairavagad Fort; इंग्रंज अधिकाऱ्याने या गडाचा उल्लेख आपल्या पुस्तकात केला होता

सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये भटकंती करणाऱ्या भटक्यांना Bhairavagad Fort म्हटले की, रायगड जिल्ह्यात असणारा अतिविराट, काळजाचा थरकाप उडवणारा मोरोशीचा भैरवगड हमखास आठवत असणार. परंतु महाराष्ट्रात फक्त एकच भैरवगड नाही. महाराष्ट्राच्या डोंगरदर्यांमध्ये एकूण 6 भैरवगड आहेत. प्रत्येक गडाचे आपापले वैशिष्ट्य आहे. या सर्वांमध्ये मोरोशीचा भैरवगड हा जास्त प्रचलित असून सह्याद्रीत भटकणाऱ्या दुर्गवेड्याचे मोरोशीचा भैरवगड सर करण्याचे स्वप्न … Read more

kenjalgad fort – वाईचा केंजळगड, छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे नामकरण केले होते

रांगड्या सातारा जिल्ह्यातील रांगडा गड म्हणजे Kenjalgad Fort होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यांमध्ये असणार्‍या डोंगरात अगदी थाटात उभा आहे. गडाची सध्या दुरावस्था झाली असली तरीही गडाचं ऐतिहासिक महत्त्व लख्ख सोन्यासारखं आज, उद्या आणि भविष्यातही चकाकत राहणार आहे. पुणे आणि वाई या दोन जिल्ह्यांच्या दरम्यान … Read more

Chandan Vandan Fort; साताऱ्याची जुळी भावंडे

शिलाहार वंशातील दुसरा भोज हा शेवटचा व श्रेष्ठ राजा होय. त्याने सातारा जिल्ह्यात 10-12 किल्ले बांधल्याची इतिहासात नोंद आहे. त्यांपैकी सप्तर्षी (सातारा किंवा अजिंक्यतारा), वैराटगड, पांडवगड, केंजळगड आणि चंदन-वंदन (Chandan Vandan Fort) हे काही प्रसिद्ध किल्ले आहेत. सन 1701 च्या आसपास फतेउल्लाखानाने वर्धनगड, नांदगिरी, चंदन, वंदन हे किल्ले जिंकून घेण्यासाठी हल्ले चढवले. मुघलांनी 6 जून … Read more

Pandavgad Fort; विराटनगरी वाईचा पहारेकरी

इतिहासाच्या पानांवर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याचं नावं सुवर्ण अक्षरांनी लिहीण्यात आले आहे. आजही इतिहासाच्या पाऊलखुणा वाईमध्ये आढळून येतात. वाईला प्रामुख्याने मंदिरे, गडकिल्ले, कृष्णा नदी आणि सह्याद्रीची विस्तीर्ण रांगेने वेढलेले आहे. वाई व खंडाळा तालुक्यांदरम्यान शंभु महादेव डोंगर रांगांमध्ये येरूळी, वेरूळी, मांढरदेव, बालेघर, धामणा आणि हरळी या प्रमुख डोंगरांचा समावेश आहे. याच शंभु महादेवाच्या डोंगर रांगेमध्ये … Read more

Jangli Jaigad – घनदाट जंगलाने वेढलेला, काळजाचा थरकाप उडवणारा जंगली जयगड

सह्याद्री आणि महाराष्ट्राचं अतूट नातं साऱ्या जगाला माहित आहे. धडकी भरवणारं जंगल, काळजाचा थरकाप उडवणाऱ्या डोंगर रांगा, मायेने जवळ घेणार्‍या आणि वेळ पडलीच तर रौद्र रूप धारण करणाऱ्या नद्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडत आहेत. अशा कठीण परिस्थिती शिवरायांनी व मावळ्यांनी जीवाची बाजी लावून गड राखले, त्यांच्यावर जीव लावला वेळप्रसंगी प्राणांची आहुती दिली मात्र, गडाचं संरक्षण करण्यात … Read more

Bhushangad Fort – खटाव तालुक्याच भूषण, किल्ले भूषणगड

Bhushangad Fort म्हणजे खटाव तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेला गड. ग्रामस्थांच्या पुढाकाराने गडाचा संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे. या भूषणगडाचे वैशिष्ट्य म्हणजे खटाव तालुक्यात दुरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात भूषणगडाचा एकमेव डोंगर अगदी उठून दिसतो. गावकाऱ्यांनी पुढाकार घेत गडावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. त्याच गडावर आणि गडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण केले आहे. त्यामुळे भूषणगड खटाव तालुक्याचे … Read more

Mahimangad – माण तालुक्याचा अभिमान, साताऱ्याच्या संरक्षणासाठी शिवरायांनी महिमानगड ताब्यात घेतला

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचा अभिमान म्हणजे Mahimangad होय. सातारा-पंढरपूर रस्त्यावर अगदी थाटात उभा असणारा महिमानगड ताशीव कातळ कड्यांमुळे आपलं लक्ष वेधून घेतो. माण तालुका आणि परिसरातील अनेक दुर्ग मुख्य डोंगर रांगेपासून वेगळे झाले असून वेगवेगळ्या डोंगरावर विराजमान झाले आहेत. महिमानगडाच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासारखी आहेत. माण तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, … Read more

Vairatgad Fort; वाईचा पाठीराखा, सतीशिळा असणारा गड

सातारा जिल्ह्यातील सर्वच जिल्ह्यांना ऐतिहासिक महत्व लाभलं आहे. परंतु या सर्व जिल्ह्यांमध्ये वाईच नाव प्रथम क्रमांकावर घ्यावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. ढोल्या गणपतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वाईमद्ये मराठी विश्वकोश कार्यालय आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण वाईतील मेणवलीच्या घाटावर आणि ढोल्या गणपतीच्या परिसरात होत असतं. ऐतिहासीक महत्व लाभलेल्या या वाई शहराचा पाठीराखा … Read more

Kalyangad Fort – दत्तांच्या पादुकांपर्यंत पोहचण्याचा एक थरारक अनुभव, साताऱ्याचा कल्याणगड

सातारा जिल्ह्यातील काही गडांची माहिती आपण मागील काही ब्लॉगमध्ये पाहीली आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला सातारा जिल्हा आपल्या वैविध्यपूर्ण इतिहासासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. शिलाहार घराण्याने बराच काळ कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. शिलाहार घराण्यातील राजा दुसरा भोज याने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात अनेक गडांची निर्मिती केली होती. या गडांमध्ये अजिंक्यतारा, भुदरगड, दातेगड सारख्या … Read more

Ajinkyatara Fort – मराठ्यांची चौथी राजधानी किल्ले अजिंक्यतारा

मराठ्यांची राजधानी म्हटल की सातारा जिल्ह्याचा उल्लेख आवर्जून केला जातो. निसर्ग संपन्नतेने नटलेला सातारा जिल्हा मराठ्यांची राजधानी आणि फौजींचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो. शुरवीरांची परंपरा लाभलेल्या या सातारा जिल्ह्यात अनेक गडकिल्ले अगदी थाटात उभे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी आहे. ज्या प्रतापगडावर अफझलखानाचा कोथळा शिवरायांनी काढला, त्या प्रतापगडापासून फुटणाऱ्या … Read more