Vairatgad Fort; वाईचा पाठीराखा, सतीशिळा असणारा गड

सातारा जिल्ह्यातील सर्वच जिल्ह्यांना ऐतिहासिक महत्व लाभलं आहे. परंतु या सर्व जिल्ह्यांमध्ये वाईच नाव प्रथम क्रमांकावर घ्यावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. ढोल्या गणपतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वाईमद्ये मराठी विश्वकोश कार्यालय आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण वाईतील मेणवलीच्या घाटावर आणि ढोल्या गणपतीच्या परिसरात होत असतं. ऐतिहासीक महत्व लाभलेल्या या वाई शहराचा पाठीराखा … Read more

Visapur Fort – दुर्गप्रेमींच्या आवडीचा लोणावळ्याच्या कुशीत वसलेला विसापूर, एकदा आवर्जून भेट द्या

छत्रपती Shivaji Maharaj यांचे सर्वाधिक वास्तव्य पुणे जिल्ह्यात होते. शिवरायांच बालपण लाल महालात गेल्यामुळे आणि राजधानी राजगड असल्यामुळे सुरुवातीला स्वराज्याचा सर्व कारभार पुण्यातून हाकला जाई. त्यामुळे पुणे आणि आसपासचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी महाराजांनी विशेष काळजी घेतली होती. पुण्यातील बऱ्यापैकी सर्वच गडांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी काही काळ घालवला आहे. विशेष लक्ष देऊन त्यांनी गडांची निर्मिती केली … Read more

Dhakoba Fort – घाटांचा रक्षणकर्ता, सह्याद्रीतला दुर्लक्षीत पण देखणा गड

दिवाळी म्हटल की सर्वत्र दिव्यांची आरास, फराळांचा गोडवा आणि पै पाहुण्यांची तारांबळ पहायला मिळते. मात्र, या सर्व धावपळीत लहान मुलांसह तरुणांची लगबग सुरू होते, ती किल्ला कोणता बांधायचा या चर्चेने. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एखादा गड निवडायचा आणि बांधकामाला सुरुवात करायची. प्रत्येकाने आपल्या लहानपणी एकदा का होईना पण किल्ला हा बनवला असेलच. पण आपल्या महाराष्ट्रात … Read more

Daulatmangal fort – माता पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी या गडावर नृत्य केलं होतं, जाणून घ्या सविस्तर…

गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा Daulatmangal Fort सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गडावर थेट गाडीने जाता येते त्यामुळे सर्व वयोगटातील व्यक्तींना पाहण्यासाठी हा गड योग्य पर्याय ठरू शकतो. गडावर प्रसिद्ध असे भुलेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे 12 व्या शतकात पूर्णपणे काळ्या बेसॉल्ट खडकात हे मंदिर बांधण्यात आले आहे. खुद्द शहाजी महाराजांनी या गडाची उभारणी … Read more

Kalyangad Fort – दत्तांच्या पादुकांपर्यंत पोहचण्याचा एक थरारक अनुभव, साताऱ्याचा कल्याणगड

सातारा जिल्ह्यातील काही गडांची माहिती आपण मागील काही ब्लॉगमध्ये पाहीली आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला सातारा जिल्हा आपल्या वैविध्यपूर्ण इतिहासासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. शिलाहार घराण्याने बराच काळ कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. शिलाहार घराण्यातील राजा दुसरा भोज याने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात अनेक गडांची निर्मिती केली होती. या गडांमध्ये अजिंक्यतारा, भुदरगड, दातेगड सारख्या … Read more

Ajinkyatara Fort – मराठ्यांची चौथी राजधानी किल्ले अजिंक्यतारा

मराठ्यांची राजधानी म्हटल की सातारा जिल्ह्याचा उल्लेख आवर्जून केला जातो. निसर्ग संपन्नतेने नटलेला सातारा जिल्हा मराठ्यांची राजधानी आणि फौजींचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो. शुरवीरांची परंपरा लाभलेल्या या सातारा जिल्ह्यात अनेक गडकिल्ले अगदी थाटात उभे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी आहे. ज्या प्रतापगडावर अफझलखानाचा कोथळा शिवरायांनी काढला, त्या प्रतापगडापासून फुटणाऱ्या … Read more

Dategad Fort – गड जिंकला अन् शिवरायांनी नामकरण केले, पाटणच्या खोऱ्यातला एक देखणा दातेगड

निसर्ग सौंदर्याने नटलेला सातारा जिल्हातील पाटण तालुका विविध गोष्टींसाठी प्रचलित आहे. पावसाळी वातवरणात या भागात असलेला सडा सडावाघापूरचा उलटा धबधबा, कोयना धरण परिसर, पवनचक्यांचा परिसर तसेच अनेक छोटी मोठी धरण या परिसराच्या सौंदर्यामध्ये भर घालतात. त्यामुळे दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक पाटणच्या खोऱ्यात क्षणभर विश्रांती घेऊन निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. पाटणचा इतिहास सुद्धा तितकाच रंजक … Read more

korigad fort – कोळ्यांचा कोरीगड, वाचा गडाचा सविस्तर इतिहास…

पुणे आणि मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणारा Korigad Fort सह्याद्रीच्या कुशीत बागडणाऱ्या मुलांना, तरुणांना आणि वयस्कर व्यक्तींना साध घालतं आहे. आयुष्याच्या टप्प्यावरील तिन्ही पिढींचा उल्लेख करण्याचे कारण, म्हणजे गडावर जाण्याची वाट अतिशय सहज, सरळ आणि चांगल्या दर्जाची आहे. त्यामुळे कोणत्याही वयातील व्यक्ती गडावर अगदी सहज जाऊ शकते. पावसाळी आणि हिवाळी वातावरणात गडाचे सौंदर्य खुलून निघते. … Read more

Belapur Fort – माणसांच्या गर्दीत हरवलेला बेलापूरचा किल्ला, एकदा अवश्य भेट द्या

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या शहरांच्या आसपास अनेक गडकिल्ले शेवटच्या घटका मोजत उभे आहेत. माणसांच्या गर्दीत तरीही दुर्लक्षीत असणार्‍या या गडांबद्दल स्थानिक लोकांना सुद्धा माहिती नाही. असाच एक दुर्लक्षीत गड म्हणजे नवी मुंबईत असणारा Belapur Fort होय. शहराच्या अगदी जवळ असणारा हा भुईकोट किल्ला अगदीच हाकेच्या अंतरावर आहे. बऱ्याच लोकांना या गडाबद्दल माहिती नाही. … Read more

Vasota Fort Trek – स्वराज्याचे तुरुंग, एक थरारक अनुभव

मराठ्यांची राजधानी सातारा जिल्ह्यातील सदाहरित घनदाट जंगलामध्ये आणि कोयनेच्या घनदाट अभयारण्यात Vasota Fort Trek हा वनदुर्ग आहे. व्याघ्रगड नावाने ओळखला जाणारा वासोटा स्वराज्याचं तुरूंग म्हणून प्रचलित आहे. गडावर जाणारा मार्ग भयभीत करणारा आणि असंख्य हिंस्त्र प्राण्यांनी भरलेला आहे. वाघ, बिबट्या, अस्वल यांसारखे वन्य प्राण्यांचा वासोटा गडाच्या परिसरात वास्तव्य आहे. त्यामुळे वासोटा गडावर जाणं म्हणजे एक … Read more